प्रकरण ७ ईश्वरवाद्यांची अंधश्रद्धा (E Book 161)
‘ईश्वरवाद्यांची ‘अंधश्रद्धा’ आणि बुद्धिवाद्यांचा ‘डोळसपणा’
संशयवादी बनून जीवन जगता येते काय ? या प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रपंचात पडण्याचेच उदाहरण घेऊ. ज्या मुलीशी (किंवा मुलाशी) आपण लग्न करायचे ठरवतो, त्या मुलीमुळे (अगर मुलामुळे) आपण प्रपंचत सुखी होऊ काय, याविषयी आपण कधी पुरावे शोधतो काय? (पुरावे सापडतात काय हा प्रश्न बाजूला ठेवू.) उलट या बाबतीत पुरावे शोधणे किंवा संशयी वृत्तीने (धोका आहे असे समजून) लग्न करणे हाच निर्बुद्धपणा आहे असे आपण मानतो. कारण प्रेमात पडणे हे बुद्धिवादाचे (चिकित्सकपणाचे, संशय वृत्तीचे) काम नसून भावनेचे (आंधळेपणाचे) काम आहे असे आपण मानतो. (प्रेम आंधळे असते (किंवा आंधळे प्रेम खरे असते) हा आपला याविषयीचा सिद्धांत प्रसिद्धच आहे!) अशा रीतीने मनुष्याला ज्याच्याशिवाय प्रपंचात जगताच येत नाही, त्या प्रेमासारख्या महत्त्वाच्या विषयातच बुद्धिवाद (संशयवाद) निरुपयोगीच नव्हे, तर अडचणीचा ठरतो !
“आर्थिक किंवा शासन संस्थेवरील विश्वासाचा दुरुपयोग करून घेणारे राजकीय व आर्थिक क्षेत्रात ‘बुवा‘ आहेत. पण म्हणून या संस्था कोणी वाईट म्हणत नाहीत, किंवा त्या वाईट ठरत नाहीत. गुन्हेगारांना जसे आर्थिक वा राजकीय क्षेत्र निषिद्ध नाही, तसे धार्मिक क्षेत्रही निषिद्ध नाही. पण धार्मिक क्षेत्रातील गुन्हेगारी निपटणे म्हणजे धर्मावरील श्रद्धा किंवा धार्मिक संस्था नष्ट करणे नव्हे”.
Reviews
Clear filtersThere are no reviews yet.