

E Book 199 बोध अंधश्रद्धेचा ४ . पान १०३ ते १२९ भाग ४ पर्यंत वृतपत्रातून प्रसिद्धी मिळवून म्हणजेच “वैज्ञानिक दृष्टी समाजात पसरवण्याचे महान ‘समाजकार्य’ करून ” आपण नाडी थोतांड ठरवत आहात. हा आपल्यामधील व नारळीकरांमधील महत्त्वाचा फरक आहे. या आपल्या समाजकार्याबद्दल समाज आपला खरोखरच ऋणी असायला पाहिजे ! यात वाईट गोष्ट एवढीच की ओक आपल्याला या कामी सहकार्य द्यायला तयार नाहीत! नसेनात का बापडे! बोध अंधश्रद्धेचा !
१२) मध्यंतरीच्या काळात प्रा. अद्वयानंद गळतगे कावीळीने आजारी पडल्याने मद्रासच्या नाडी केंद्रांना भेट देण्यास येऊ शकले नाहीत. माझ्या बदलीचा हुकूम आला आणि मी मे ९६ अखेर तांबरम सोडले. अं.नि.स. किंवा त्यांच्या पंथातील अनेक बुद्धिप्रामाण्यवादी म्हणवून घेणाऱ्यांनी विज्ञाननिष्ठेचे चाळ पायात बांधून नाडी विरोधी भूमिकेतून तांडवनृत्य केले तरी माझा त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन कसा आहे तो सविस्तर मांडतो.
कोणत्याही विचारांना सामोरे जाणे हे शुभलक्षण होय. काही लोक त्या विचारांना सकारात्मकपणे, मान्य करण्यास योग्य असे म्हणून सामारो जातील तर काहींना ते विचार अमान्य करण्याच्या मार्गाने, नकारात्मकपणे सामोरे जावेसे वाटेल. दोन्ही परिस्थितीत ते विचारांकडे आकर्षित झाले हे फार महत्त्वाचे. या उलट या विचारांकडे दुर्लक्ष, उपेक्षा करून टाळणे हा दृष्टिकोन फार घातक.
Reviews
Clear filtersThere are no reviews yet.