अविश्वासी लोकांचा प्रादुर्भाव… आजकाल भारतीय संस्कृतीच्या विचारांना अमान्य करुन त्यातून असे घडणे शक्य नाही, आजच्या शास्त्राला ते मान्य नाही, अशी ओरड करणारे लोक आणि काही संस्था आपल्या पाहण्यात असतात. प्राचीन काळापासून असे लोक त्या त्या काळात होते त्यांचे सामाजिक रुप बदलत गेले पण मनोवृत्ती तशीच राहिली. सध्या या मंडळींना निरीश्वरवादी म्हणून मान्यता असते. पुर्वीचे लोक ईश्वरवादी असून त्यांच्या प्रस्थापित विचारधारेला विसंगतीतून संघर्ष निर्माण होत असे जाणवते. याची काही उदाहरणे पोथीतील कथनातून प्रकर्षाने नोंदवली गेली आहेत. त्यांचे विचार विसंवाद, वादावादीचे प्रसंग, पंचम वर्गीय अंत्यजांना त्यांच्या वस्तीत जाऊन दत्त संप्रदायाची दीक्षा फुकट दिल्या नंतर, त्यांच्या आईवडिलांना वाळीत टाकले जायची भिती वाटून, ‘तू पीठापुरम सोडून जाऊ नकोस’ असा लकडा लावला असावा. “घरीच रहा, पीठापुरम सोडून जाऊ नको म्हणून तुम्ही घरच्यांनी मला गळ घातली तरी मी घर सोडून निघून जाणार असे लहानपणापासून ते म्हणत असत. हे माहित असूनही आईवडिलांना गावकीच्या वाळीत टाकतील या भितीने इतके घेरले असावे की ते’ वचन मोडायला’ तयार व्हायला त्यांची मनस्थिती पूरक झाली असावी. म्हणून आई वडीलांना सोडून ते उत्तरभारताची यात्रा करायला मी घराबाहेर जाईन असे वचनाची आठवण देऊन भावाच्या बहिणींना योग्य ते आशीर्वाद देऊन निघून गेले. कदाचित काही काळानंतर त्यांच्या कुटुंबीयांना ती वास्तू सोडून जावे लागले. त्या जागेची मालकी कालांतराने परत त्यांच्या कुळातील वारसांना ती वास्तू मिळून पीठापुरममधे त्यांच्या जमिनीत खोल पुरलेल्या पादुका आणि शंकर भट्टांनी लिहिलेली पोथी बाहेर काढून मग त्या वास्तूला व पोथाला अत्यंत पावित्र्य व लोकमान्यता मिळाली. सगळी नाटके आहेत… अ १०.८१ अप्पलराज शर्मा श्रींचे वडील म्हणतात, बेटा, तू नेहमी सांगतोस, मी दत्त प्रभू आहे, नृसिंहसरस्वती नावाने पुन्हा अवतार घेणार आहे, लहानपणापासून तू आम्हाला अनाकलनीय आहेस. पण लोक कावळ्यासारखे असतात रे, तुझे बोलणे ऐकून ते म्हणतात, ‘ही याची सगळी नाटके आहेत. फालतूच्या गप्पा आहेत. वेड्यासारखा बरळतो झाले.” अ २०.१६५ सावधानी नामक शास्त्री ब्राह्मणसभेत वितंडवाद घालत म्हणत, ‘श्रीपादच दत्त कशावरून मल्लादि व घंटीकोट यांना समाजातून बहिष्कृत करावे. कारण ते धर्मभ्रष्ट व अनाचारी आहेत’.
(E Book 7) भाग ७ सामाजिक घडी
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 9) भाग ९ पंचांगातील संदर्भ
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 8) भाग ८ अंधश्रद्धा प्रभाव
Description
Discounted E-books
(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur
(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory
(E Book 209) Shivaji Maharaj A visionary of Indian Navy
(E Book – 240) शिवाजी महाराज का पहला समुद्री नौका वहन
(E Book 217) नौदलाचे-स्वप्नद्रष्टा-शिवाजी-महाराज
(E Book 218) भारतीय नौसेना के स्वप्नद्रष्टा
Top E-books
Customer Reviews
Rated 0 out of 5
0 reviews
Rated 5 out of 5
0
Rated 4 out of 5
0
Rated 3 out of 5
0
Rated 2 out of 5
0
Rated 1 out of 5
0
Be the first to review “(E Book 8) भाग ८ अंधश्रद्धा प्रभाव” Cancel reply

Reviews
Clear filtersThere are no reviews yet.