(E Book 157) प्रकरण ३. ज्योतिषाला आव्हान – पलायन

 

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

Description

 

‘ज्योतिषशास्त्र खरे ठरले तर समिती बरखास्त करू’ इति अंनिस –

काही महिन्यांपूर्वी पुण्याचे प्रसिद्ध परमानसशास्त्रज्ञ प्रा. व. वि. अकोलकर यांचे मला अचानक एक पत्र आले. आणि आज मला या समितीविषयी पुन्हा नाइलाजाने लेखनप्रपंच करावा लागत आहे. (हे १९९३ साली केलेले लेखन आहे.) प्रा. अकोलकरांनी प्रस्तुत पत्रात अंनिस व अखिल भारतीय ज्योतिष- संस्थेचे संचालक श्री. गिरीश शहा यांच्यामधील ज्योतिषविषयक वादाकडे माझे लक्ष वेधले होते. या वादात ‘ज्योतिष हे शास्त्र आहे का’ या प्रश्नाच्या कसोटीसाठी ज्या अटी पाळावयाच्या, त्यांची स्वतः अकोलकरांनी तयार केलेल्या (न श्री. शहा यांना पाठविलेल्या) यादीची एक प्रत व शहा यांनी उत्तरादाखल पाठविलेले मूळ पत्र(क) त्यांनी मला आपल्या पत्रासोबत पाठविले होते. (अधिक माहितीसाठी लोकसत्ता व म. टाईम्स या वृत्तपत्रामधील बातम्यांची दोन कात्रणेही जोडली होती.) हे वाचून माझी पहिली प्रतिक्रिया फारशी अनुकूल झाली नाही. पण थोड्या विचाराअंती ही उपेक्षा योग्य नाही, असे वाटू लागले. आणि लगेच अकोलकरांना मी पत्राने कळविले, की या वादात काही करता येते का हे पाहण्यासाठी मी श्री. शहा व अंनिसचे सांगलीचे कार्यकर्ते यांची प्रत्यक्ष भेट घेतो. त्याप्रमाणे प्रथम शहा यांना भेटलोही. पण पुढील घटना सांगण्यापूर्वी अंनिसविषयी लिहिणे म्हणजे वेळ व श्रम यांचा शुद्ध अपव्यय आहे असे म्हणणाऱ्या मला याविषयी लिहिणेच नव्हे, तर भेटी घेण्याचाही खटाटोप का करावासा वाटला हे सांगितले पाहिजे.

महाराष्ट्रातील अंनिसची स्थापना समाजात ज्ञानाचा वा विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी झालेली नसून विशिष्ट मत प्रचार व तद्द्वारा सवंग वृत्तपत्रीय प्रसिद्धी मिळविण्यासाठी झालेली असल्याचे एव्हाना जाणत्या लोकांना कळून चुकले आहे. एखाद्या राजकीय पक्षाने राजकीय स्वार्थासाठी ‘गरिबी हटाव’ची घोषणा द्यावी, तसे या समितीने स्वतः च्या सामाजिक प्रतिष्ठेसाठी व प्रसिद्धीसाठी ‘अंधश्रद्धा निर्मूलना’ची घोषणा दिली आहे.

फलज्योतिष हा प्रकार चमत्कारात मोडत नसल्यामुळे ‘आम्ही सांगू त्या अटीखाली चमत्कार करून दाखवा’ असे म्हणून असंभाव्य अटींचा घोळ घालून कालहरण करण्याचा जो निंद्य प्रकार अंनिसचे लोक नेहमी करतात, तो येथे शक्य नसल्यामुळे आव्हान प्रक्रियेतून पळ काढण्याचा त्यांचा नेहमीचा मार्ग खुंटतो.

दुसरी फलज्योतिषविषयक जमेची बाजू अशी, की फलज्योतिष ही अंधश्रद्धा आहे असे म्हणून ज्योतिष सांगणाऱ्यावर बुवाबाजीचा वा फसवणुकीचा आरोप त्यांना करता येत नाही. असा आरोप करायचाच झाला तर ज्या वृत्तपत्रांतून हे लोक आपली प्रसिद्धी मिळवतात त्या आठवड्याचे भविष्य देणाऱ्या) वृत्तपत्रांवर त्यांना प्रथम हा आरोप करावा लागेल व त्यांच्याविरुद्ध आघाडी उघडावी लागेल. हा त्यांचा आत्महत्येचा मार्ग असल्याने तो ते कधीच अवलंबणार नाहीत. पण वस्तुतः ज्योतिषामध्ये कसलीही फसवणूक वा बुवाबाजी नाही. फसवणूक म्हणजे सत्य लपविणे होय. येथे सत्य भविष्याच्या पोटात असल्यामुळे ते कोणालाही खुद्द ज्योतिषालाही माहीत नसते. ते लपविणे राहोच, उलट ते उघड करून सांगण्याचाच ज्योतिषी प्रयत्न करतो. त्यामुळे फसवणुकीचा किंवा रूढार्थाने कोणाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही. तात्पर्य, ज्योतिष फसवणुकीला वाव देणारी अंधश्रद्धा ठरत नाही.

Discounted E-books

(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 209) Shivaji Maharaj A visionary of Indian Navy

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 217) नौदलाचे-स्वप्नद्रष्टा-शिवाजी-महाराज

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 218) भारतीय नौसेना के स्वप्नद्रष्टा

Original price was: ₹2,000.00.Current price is: ₹100.00.

Customer Reviews

0 reviews
0
0
0
0
0

There are no reviews yet.

Be the first to review “(E Book 157) प्रकरण ३. ज्योतिषाला आव्हान – पलायन”

Your email address will not be published. Required fields are marked *